एकदा
महत्त्वाच्या
कामानिमित्ताने
मी लासलगावला
गेलो होतो.
तीसेक
वर्षांपूर्वीची
गोष्ट आहे.
ज्या
व्यक्तीला
भेटायचे
होते,
ती
व्यक्ती
दिवसभरात
परतेल तेव्हा
परतेल,
अशा
अनिश्चिततेच्या
भोवऱ्यात मी
अडकलो होतो.
रात्रीचे
साडेसात
वाजले होते.
सटाण्याला
परत जायला
एसटीही
नव्हती. माझा
आतेभाऊ
शिरवाड्याला
प्राथमिक
शिक्षक
म्हणून
नोकरीस होता.
आता
त्याच्याकडेच
जाऊन मुक्काम
करावा या
निर्णयाने मी
कोपरगावकडे
जाणारी एस. टी.
धरली व
निघालो.
साडेआठच्या
आसपास मी
फाट्यावर
उतरून
शिरवाड्याला
पोचलो.
गुरूजींच्या
घराचा पत्ता
विचारला.
पूर्वी एकदा
केव्हातरी
गेलो होतो,
त्यामुळे
घर शोधणे अवघड
होते. मी पत्ता
विचारताच ते
इसम म्हणाले,
‘गुरूजींची
इथून बदली
झाली.’
‘कुठे?’
माझा
प्रश्न.
‘इथून
जवळच
वाकदला.’
‘किती
लांब आहे?’
माझा
प्रश्न.
‘असेल
तीन-चार कोस.’
‘कसं
जावं लागेल?’
माझा
प्रश्न.
‘सरळ
या गल्लीतून
जा. पुढे पांदी
लागेल.
सोडायची
नाही.’
‘ठीक
आहे’,
असं
म्हणून मी
मार्गस्थ
झालो.
गल्लीच्या
दुसऱ्या
टोकावर एका
ओट्यावर
चार-पाचजणांचं
एक कुटुंब
जेवण करत
होतं,
कंदीलाच्या
पिवळसर
प्रकाशात.
माझ्या
पावलांची
चाहूल लागताच
कुत्रं
भुंकलं.
त्यांनी
कुत्र्याला
गप्प
केलं.
त्यातील
एकानं कंदील
उचलून मी कोण
जातोय म्हणून
पाहिलं. मी
नवखा
वाटल्यामुळे
माझी
विचारपूस
केली. मी
आवश्यक ते
माफक शब्दांत
सांगितलं.
‘तुम्ही
एकटे कसे
जाणार हो!
थांबा. तुम्ही
आमच्या बरोबर
जेवा. आम्ही
आताच सुरुवात
केली आहे. लाजू
नका.
गुर्जींचा
आणि आमचा
चांगला घरोबा
आहे.
गुर्जींची
पाव्हणे ते
आमचेच
पाव्हणे.’
मी
जेवायला नकार
दिला.
नम्रतेने पण
ठामपणे.
त्यातल्या
बाई
म्हणाल्या,
‘भाऊ
किती वेळ होईल.
निम्म्याशिम्म्या
रातीला पोचाल.
गुर्जी काय
म्हंतील. जेवा
इथं.’
मी
जेवलो. पातळं
पिठलं,
ज्वारीची
भाकरी,
कांदा.
दिवसभर
अगतिकतेने
वाट पाहत
लंघून गेलो
होतो. छान
जेवलो.
जेवताना
कळलं की ते
आख्खं कुटुंब
रोजगार
हमीच्या
कामावर
जाणारं होतं.
सकाळी नऊला
जायचं व
सायंकाळी
सातला
परतायचं हा
त्यांचा
दिनक्रम होता.
त्यातला एकजण
आतमध्ये गेला
आणि एक
लांबलचक काठी
घेऊन आला.
कंदील उचलला
आणि
‘चला
पाव्हणं’
म्हणत
मला सोडायला
निघाला. दोनेक
तासांनी
आम्ही वाकदला
पोचलो.
गुर्जींना
हाका मारून
उठवलं.
पोहचवायला
येणाऱ्या
गृहस्थाच्या
चेहेऱ्यावर
एक प्रचंड
कृतार्थता
होती. हाडं
दुखवणारे
दिवसभर श्रम
करूनही
रात्री पहाटे
अडल्या-नडलेल्यांना
मदत करण्याचा
झळा मूळचाच
असल्यामुळे
तो उचंबळला.
अर्धा तास
गप्पा करून ते
परतले. रात्री
दीड वाजता ते
घरी पोचले
असणार. आपण असं
काही
भव्यदिव्य
केलं याची
वार्ता कधी
केली नसेल. मला
निर्गुणाचा
साक्षात्कार
झाला.
सगुण-निर्गुण
दोन्ही एकच
याची प्रतीती
आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट