भाविकांची
स्नानाची
जागा.
महाशिवरात्रीची
महागर्दी.
आईने
भावाला
आंघोळ
घातली.
तिनेही
आंघोळ
केली.
परतणार
तोच
भावाला
गर्दीचा
धक्का
लागला.
तो
कुंडात
पडला.
१०-१२
वर्षांचं
पोर.
आई
घाबरली.
भाऊ
गटांगळ्या
खाऊ
लागला.
तिथे
गर्दी
महामूर
होती.
बायामाणसं-पोरंसोरं
सगळीच
होती.
आईने
एका
बाप्याला
सांगितले.
‘भाऊ
पोरगं
बुडतंय.
वाचव
त्याला.’
गळ्यात
टपोऱ्या
मण्यांची
माळ.
डोक्याचा
तुळतुळीत
गोटा
केलेला.
जवळपास
अर्धाफूट
शेंडी
ठेवलेली.
असा
बहुजन
समाजातील
गृहस्थ
अंघोळ
उरकून
धोतर
नेसून
शर्ट
परिधान
करीत
होता.
म्हणाला,
‘आता
माझे
कपडे
ओले
होतील.
आताच
मी
अंघोळ
केली.’
हे
संभाषण
चालू
असतानाच
आमच्या
गावच्या
आणि
आईच्या
सोबत
गेलेल्या
दोन
बायकांनी
कपड्यांची
पर्वा
न
करता
भावाला
लगेचच
बाहेर
काढलं
होतं.
घाबरलेल्या-भेदरलेल्या
भावाचं
अंग
त्या
पुसत
होत्या.
डोक्याचे
केस
कोरडे
करत
होत्या.
नाकातोंडातलं
पाणी
काढत
होत्या.
बाजूला
नदीच्या
वाळूत
बसून
भावाला
धीर
देत
होत्या.
अंगावरचे
कपडे
सुकल्यावर
त्या
देवदर्शनाला
गेल्या.
खजुरादी
फराळ
करून
त्या
सात-आठ
किलोमीटरच्या
प्रवासाला
जशा
पायीच
आल्या
होत्या
तशा
पायीच
निघाल्या.
आईने
घडलेली
हकीगत
घरी
येताच
सांगितली.
मीही
लहानच
होतो
तेव्हा.
आज
ही
घटना
आठवते
तेव्हा
मनात
विचारतरंग
उठतात.
गळ्यात
माळ
असणाऱ्या
त्या
गृहस्थाला
तो
प्रसंग
का
स्पर्शला
नाही?
‘बुडती
हे
जन
न
देखवे
डोळा’
असे
म्हणणाऱ्या
तुकोबारायांचा
कळवळा
का
उत्पन्न
झाला
नाही?
त्या
गृहस्थाला
लौकिक
अर्थाने
बुडत्याला
वाचवायचे
होते,
त्यामुळे
पात्रापात्रतेचं
प्रश्न
नव्हता.
पुरुष
असल्यामुळे
त्यांना
विनवणी
केली
होती.
त्या
कुंडात
स्नान
करून
‘तीर्था
जाऊनिया
तुवा
काय
केले।
चर्म
प्रक्षाळिले
वरिवरि’
हाच
अनुभव
घेतला
होता
का?
ज्या
संप्रदायाची
बिरुदे
त्यांच्या
देहावर
ते
मिरवत
होते,
त्या
संप्रदायाचे
संस्कार
त्यांच्यावर
जे
झाले
असतील
ते
रुजले
नसतील
काय?
बाह्योपाधींनाच
त्यांच्या
लेखी
महत्त्व
असेल
काय?
एका
तीर्थाच्या
ठिकाणी
नुकतीच
अंघोळ
करूनही
ते
कोरडे
पाषाण
का
राहिले
असावेत?
अशा
अनेक
प्रश्नांची
मालिका
मनासमोर
येते.
आपण
जे
शिकतो,
करतो
त्याची
काहीतरी
सामाजिक
फलश्रुती
असावी
अशी
अपेक्षा
असते.
ज्ञानाचं
कर्मात
रूपांतरच
सामाजिक
फलश्रुती
सिद्ध
करू
शकतं.
सगुणाकडून
निर्गुणाकडे
होणारा
प्रवास
तो
हाच
असतो.
‘व्यर्थ
गेला
तुका।
व्यर्थ
ज्ञानेश्वर।
संतांचे
पुकार
वांझ
झाले।।’
हे
कविवर्य
कुसुमाग्रजांचे
उद्गार
याच
खंतावणाऱ्या
जाणिवेतून
प्रकटलेले
आहेत.
-
दिलीप
धोंडगे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट