Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 32

ढगांआडचा जीवितचंद्र

$
0
0

आहे असे मानले जाते. पुनर्जन्माबाबत मतमतांतरे आहेत. माणसाचा जन्म-आयुष्य-जगणं-पुरुषार्थ-कर्म-निष्काम कर्म-कर्मसंन्यास-उपकारापुरतं उरणं आणि कृतज्ञतेनं आणि कृतार्थतेनं जगाचा निरोप घेणं हा प्रवास फार सुंदर आहे. प्रत्येक टप्प्यावर कसोटी आहे. वर उल्लेखिलेले टप्पे फार ढोबळ आहेत. त्यांचा अधिक सूक्ष्मपणे विचार करता येऊ शकतो. पण मुख्य मुद्दा असा की, प्रत्येक टप्प्यावरच्या कसोटीला उत्तीर्ण होणे. त्यासाठी मनावर अंकुश पाहिजे. जीवितध्येय निश्चित करण्यासाठी प्रचंड आवाका पाहिजे. ध्येयपथावरून धुंदपणे वाटचाल करण्याचा निश्चय पाहिजे. अंगीकृत कार्याचे क्षितिज विस्तीर्ण करण्यासाठी अंतःकरणाची विशालता पाहिजे. आपले व्यक्तिगत पातळीवरील कार्य त्याची फलश्रृती ही सामूहिक पातळीवर करण्याइतकी समाजमनस्कता पाहिजे. असे काही असले तर जगणे कृतज्ञ आणि कृतार्थ होऊ शकते. जगण्याचा परिघ सीमित करायचा की विस्तीर्ण करायचा हे ज्याच्या-त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असते. पण मानसिकतेची जडणघडण फार महत्त्वाची आहे. यासाठी आपल्या यच्चयावत जागतिक पातळीपर्यंतच्या अस्तित्त्वविषयक शोध घेणाऱ्या तत्त्वज्ञानात्मक वाड़मयाचं संचित आपणाला लाभलेलं आहे. एतद्देशीय तसेच जगभरातील भक्तीसंप्रदायांचं वाड़मयही ह्याच स्वरुपाचं आहे. मौखिक परंपरेत याच वाड़मयाचा अनुवाद करणारं लोकसाहित्याचंही धन आम्हाला उपलब्ध आहे. आधुनिक आणि समकालिन अभिजात वाड़मयाच्या निर्मितीची प्रेरणाही मानवी जगण्याचे श्रेयस आणि प्रेयस यांचा शोध घेणं याच राहिलेल्या आहेत. त्यांचा कमालीचा सूचितार्थ, व्यंजनात्मकता, गुंतागुंत रुपाकात्मता जाणून घेण्यासाठी आपण क्षमताशील व्हायला हवं. मानवावर अनवरत अभिषेक करणारे अनेकानेक धर्म, संप्रदाय, तत्त्वज्ञाने, कला, साहित्य इतरही अनेक बाबी आहेत. या अभिषेकाचा अंतिम उद्देश मानवाचे शुद्धीकरण हाच आहे. मानवाच्या मनात उदित होणारा अशुद्धतेचा एक छोटासा बिंदूदेखील त्याचं जगणं अशुद्ध करून टाकतो. मनात उदित होणाऱ्या अशुद्ध विचाराबाबत हे जितके खरे, तितकेच त्याच्या भोवतालच्या पर्यावरणातील विचार-आचार स्पर्शानेही हे घडू शकते. यासाठी पर्यावरणाची शुद्धता राखण्यासाठीही उपरोक्त अभिषेकाची गरज असते. पण, मानवी वर्तनाचा तऱ्हेवाईकपणा हडेलहप्पीपणा, बेफिकीरपणा, स्वच्छंदीपणा यांमुळे शुद्ध पर्यावरणाचा ऱ्हास होतो. परिमामतः मानवी परस्परसंबंध कमालीचे प्रदूषित होतात, परस्परसामंजस्य, परस्परांवरील विश्वास यांना ढळ पोचते. आपल्या कृतीचे आपणच कठोर परीक्षक होण्याची गरज निर्माण होते. आपल्या कला, साहित्याच्या प्रकाशात आपल्या जगण्याचे परिक्षण करायला हवे. असे घडले तर त्यांचीही सामाजिक फलश्रृती सिद्ध होते. मानवाचं श्रेष्ठत्व त्याच्या बुद्धीप्रधानतेत आहे. लहान चणीचा मनुष्य आपल्या बुद्धीप्रधानतेने या विश्वाला गवसणी घालतानाच या विराट विश्वातील रहस्ये जाणून घेत आहे; पण आपल्या जगण्यातील रहस्यमयता त्याची वास्तविकता का जाणून घेत नाही किंवा जाणूनही आचरण का करीत नाही किंवा कोणत्या प्रलोभनांच्या ढगांआड त्याचा हा सुंदर जीवितचंद्र लपून बसतो हा खरा प्रश्न आहे.
- डॉ. दिलीप धोंडगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 32

Trending Articles


Girasoles para colorear


mayabang Quotes, Torpe Quotes, tanga Quotes


Tagalog Quotes About Crush – Tagalog Love Quotes


OFW quotes : Pinoy Tagalog Quotes


Long Distance Relationship Tagalog Love Quotes


Tagalog Quotes To Move on and More Love Love Love Quotes


5 Tagalog Relationship Rules


Best Crush Tagalog Quotes And Sayings 2017


Re:Mutton Pies (lleechef)


FORECLOSURE OF REAL ESTATE MORTGAGE


Sapos para colorear


tagalog love Quotes – Tiwala Quotes


Break up Quotes Tagalog Love Quote – Broken Hearted Quotes Tagalog


Patama Quotes : Tagalog Inspirational Quotes


Pamatay na Banat and Mga Patama Love Quotes


Tagalog Long Distance Relationship Love Quotes


BARKADA TAGALOG QUOTES


“BAHAY KUBO HUGOT”


Vimeo 10.7.0 by Vimeo.com, Inc.


Vimeo 10.7.1 by Vimeo.com, Inc.



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>